suvichar

न बोले तुम ना मैने कुछ कहा...

Webdunia
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:39 IST)
आपल्या जगण्याच्या सर्कशीत किती गोष्टी आपण miss करतो ना...!
 
कधी कधी वाटतं माणूस फक्त नातं टिकवायचा प्रयत्न करतो पण त्याऐवजी त्या नात्यातला जिवंतपणा टिकवायचा जर प्रयत्न केला तर नातं छान बहरतं फुलतं... सुगंधी होतं....
 
पण होतं काय ना... चार माणसाच्या कुटुंबात नवऱ्याला वाटतं बायकोचं कौतुक केलं तर बायको डोक्यावर बसेल नी बायकोला वाटतं नवऱ्याचं कौतुक केलं तर तो डोक्यावर बसेल...
 
आणि नवरा बायको दोघांनाही वाटतं, मुलांचं कौतुक केलं तर ते डोक्यावर बसतील...
 
पण माणसाच्या अनेक चुकीच्या विचारांपैकी हाही एक विचार आहे...
 
Appreciation always gives us strength...
चार दिवसांच्या आयुष्यात माणुस कितीदा विचार करतो की एक दिवस मी माझ्या लाईफ पार्टनरला नक्की सांगेन की ती किंवा तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे...
 
अरे पण हा एक दिवस माहितीये का तुला मिळणार आहे की नाही...???
 
त्यामुळे जेव्हा जे वाटेल ते बोलून दाखवलं तर जगायला मजा येते, शक्ती मिळते...
 
हा विचार आपण का करत नसू... देवच जाणे...!
 
करा की कौतुक... म्हणा... 
 
"भाजी छान झालीये..."
 
"घर किती छान ठेवलंस..."
 
"साडी छान दिसतीये..."
 
"कानातलं छान दिसतंय..."
 
"पोळी किती मऊ करतेस..."
 
"मुलांची किती काळजी घेतेस....."
 
अरे फुकटच तर आहे हे सगळं...
मग होऊन जाऊ द्या की जोरात....
 
बायकांच पण तेच... 
म्हणा की जरा नवऱ्याला...
 
"थकलात का... किती टेन्शन घेता..."
 
"शर्ट छान दिसतोय... स्मार्ट दिसताय..."
 
"ड्राईव्ह किती छान करता..."
 
"फळं मस्तच आणता..."
 
"स्ट्रेस किती हुशारीने हँडल करता......"
 
हे कौतुकाचे दोन शब्द एकमेकांना शंभर हत्तीचं बळ देतात...
 
पण आपला हात मात्र अखडताच असतो appreciate 
करायच्या बाबतीत...
 
हं... पण ओरडताना, एकमेकांचे ऊणेदुणे काढताना मात्र सगळं कसं दिलखुलास चालू असतं...!!!
 
माणूस का असं वागत असेल हे एक कोडंच आहे...!
 
तेच आपण आपल्या आई वडिलांच्या बाबतीतही करतो... अरे म्हणा की एकदा आईवडिलांना... 
 
"किती केलंत आमच्यासाठी...!"
 
त्यांचे कान तरसतात मुलांकडून दोन गोड शब्द ऐकण्यासाठी...
 
असो.........
 
व्यक्त होणं आयुष्यात खुप महत्वाचं असतं... मग ते कुणाबद्दलही का असेना...
 
वेळ न घालवता तेव्हाच्या तेव्हाच ते करायला हवं...
प्रेम व्यक्त करायलाच हवं...
माणूस फक्त भावनांचा भुकेला असतो. बाकी तर सगळं चालुच असतं...
 
शेवटी आपण जगत कशासाठी असतो हो...? फक्त मशीनसारखं काम करण्यासाठी थोडंच जन्माला आलोय...!!!
 
एक हलकसं स्माईल...
 
एक प्रेमळ नजर....
 
एक जादुची झप्पी...
 
दोन कौतुकाचे शब्द...
 
यात एवढी जादू आहे ना जी आपल्या आयुष्याचं सोनं करेल...!
 
पण ह्या फुकट असलेल्या गोष्टी करण्यात माणुस सगळ्यात जास्त कंजुसी करतो.
 
बरं झालं या गोष्टींना पैसे लागत नाहीत नाहीतर त्या या जगातूनच नष्ट झाल्या असत्या...!!!
 
कौतुक करण्याची appreciate एकही संधी सोडायची
नाही हे आतातरी मी नक्की ठरवलंय.....
 
बघू काही चेंजेंस होतात का आयुष्यात...
 
नाहीतर असं होऊ नये की आपल्यालाच
म्हणावं लागेल....
 
न बोले तुम 
ना मैने कुछ कहा...!!!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

प्रीती झिंटाने मुंबईत नवीन घर भाड्याने घेतले, दरमहाचे भाडे जाणून घ्या

फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६०व्या वर्षी बांधली होती लग्नगाठ

पुढील लेख
Show comments