Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाभारताच्या कथा: कर्णाच्या जन्माची कहाणी

Webdunia
बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 (20:30 IST)
Kids story : दानवीर कर्ण हा पांडवांमध्ये सर्वात मोठा होता आणि फक्त माता कुंतीलाच याबद्दल माहिती होती. ही कहाणी एका योद्ध्याची आहे ज्याला लोक दानवीर कर्ण म्हणून ओळखतात. कर्णाचा जन्म माता कुंतीच्या विवाहपूर्वी झाला होता. याकरिता, माता कुंतीने लज्जेच्या भयाने कर्णाचा त्याग केला, परंतु कुंतीच्या विवाहपूर्वी कर्णाचा जन्म कसा झाला यामागे एक कहाणी आहे.
ALSO READ: महाभारताच्या कथा : कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील मैत्री
ही कथा त्या काळाची आहे जेव्हा माता कुंतीचा विवाह झाला न्हवता आणि ती फक्त एक राजकुमारी होती. त्याच काळात, ऋषी दुर्वासा राजकुमारी कुंतीच्या वडिलांच्या राजवाड्यात वर्षभर पाहुणे म्हणून राहिले. कुंतीने एक वर्ष त्यांची मनोभावे सेवा केली. राजकुमारीच्या सेवेने ऋषी दुर्वासा प्रसन्न झाले आणि त्यांनी राजकुमारी कुंतीला वरदान दिले की ती कोणत्याही देवाला बोलावू शकते आणि त्यांपासून आपत्य प्राप्तीचे वरदान मागू शकते.
ALSO READ: महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण
आता एके दिवशी राजकुमारी  कुंतीच्या मनात विचार आला की वरदानाची परीक्षा का घेऊ नये. असा विचार करून तिने सूर्यदेवाची प्रार्थना केली आणि त्यांना बोलावले. सूर्यदेवाच्या आगमनामुळे आणि वरदानामुळे राजकुमारी कुंती विवाहपूर्वी गर्भवती राहिली. काही काळानंतर तिने एका बाळाला जन्म दिला, जो सूर्य देवासारखा शक्तिशाली आणि तेजस्वी होता. तसेच जन्मापासूनच बाळाच्या कानात कवचकुंडले होती 
 
कुमारी असताना मुलाला जन्म दिल्यामुळे लज्जेच्या भयाने राजकुमारी कुंतीने बाळाला एका पेटीत बंद केले आणि नदीत सोडले. तसेच ही पेटी एका सारथीला आणि त्याच्या पत्नीला सापडली, ज्यांना मूलबाळ नव्हते. कर्णाच्या रूपात मुलगा झाल्याने दोघेही खूप आनंदी झाले आणि त्याचे संगोपन करू लागले. सूर्याचा हा पुत्र नंतर दानवीर कर्ण म्हणून ओळखला जाऊ लागला आणि काही वर्षांनंतर कुरुक्षेत्राच्या युद्धात तो पाच पांडवांसमोर एक शक्तिशाली योद्धा म्हणून उभा राहिला.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments