Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात

Webdunia
शनिवार, 15 डिसेंबर 2018 (14:59 IST)
एकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात?'' 
 
बिरबल म्हणाला, ''खाविंद, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत असतो की, मला जे जे घ्यावंसं वाटेल, ते मी माझ्या मुठीत याप्रमाणे घट्ट पकडून माझं करीन. परंतु मरताना मात्र आपल्या मुठी उघड्या ठेवून तो भोवतालच्या लोकांना सांगू पाहतो की, तुम्ही जगातील वस्तूंचा लोभ धरू नका. आयुष्यभर लोभापायी मी माझ्या मुठी भरल्या, पण त्या सर्व गोष्टी इथेच ठेवून मला रिकाम्या हाताने जग सोडावे लागत आहे. माणूस या जगात प्रवेश करताना बंद मुठीने येतो, पण जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात, त्याचे असे स्पष्टीकरण आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

जागतिक उच्च रक्तदाब दिन 2025: उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि थीम जाणून घ्या

World Hypertension Day 2025 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments