Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक शेतकरी खूप काळजीत होता. त्याला आपल्या शेतात पाण्याची गरज होती. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून विहीर शोधत होता. एकदा त्याला अचानक एक विहीर दिसली. ही विहीर त्याच्या शेताच्या अगदी जवळ होती. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आनंद झाला. आता आपला त्रास संपला असे त्याला वाटले. तसेच दुसऱ्या दिवशी तो पाणी घेण्यासाठी विहिरीवर पोहोचला. त्याने विहिरीजवळ ठेवलेली बादली विहिरीत टाकताच एक माणूस तेथे आला. तो शेतकऱ्याला म्हणाला, ही विहीर माझी आहे. तुम्ही त्यातून पाणी घेऊ शकत नाही. या विहिरीतून पाणी घ्यायचे असेल तर ही विहीर विकत घ्यावी लागेल. हे ऐकून शेतकरी  मनात विचार करू लागला की ही विहीर विकत घेतली तर मला कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही आणि पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. आता दोघांमध्ये रक्कम ठरली. शेतकऱ्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून, शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी पैसे देण्याचे सांगितले आणि घरी निघून गेला.
 
शेतकऱ्याने आपल्या जवळच्या व्यक्ती आणि मित्रमंडळींशी याबाबत चर्चा केली आणि विहिरीसाठी ठरलेल्या रकमेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. व त्याने रक्कम जमा केली. आता त्या माणसाच्या घरी पोहोचल्यावर शेतकऱ्याने त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि विहीर विकत घेतली. आता विहीर शेतकऱ्याची होती त्यामुळे पाणी काढायला उशीर केला नाही. शेतकऱ्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादली उचलताच तो माणूस पुन्हा म्हणाला थांबा, तुम्हाला या विहिरीतून पाणी काढता येणार नाही. मी तुला विहीर विकली, विहिरीतील पाणी अजूनही माझे आहे. शेतकरी हतबल झाला आणि न्यायासाठी तक्रार करण्यासाठी राजाच्या दरबारात गेला. तसेच अकबर राजाने शेतकऱ्याची संपूर्ण कहाणी ऐकली आणि नंतर विहीर विकलेल्या माणसाला आपल्या दरबारात बोलावले. राजाने त्याला विचारले, तू या शेतकऱ्याला तुझी विहीर विकलीस, मग त्याला पाणी का घेऊ देत नाहीस? तो माणूस म्हणाला, महाराज, मी त्यांना फक्त विहीर विकली होती, पाणी नाही. हे ऐकून राजाही विचार करू लागला. बराच वेळ विचार करूनही जेव्हा तो हा प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरला तेव्हा त्यांनी बिरबलाला बोलावले. 
 
बिरबल खूप हुशार होता. संपूर्ण गोष्ट कळल्यावर बिरबल त्या माणसाला म्हणाला, ठीक आहे, तू विहीर विकलीस, पाणी नाही. मग शेतकऱ्यांच्या विहिरीत तुमचे पाणी काय? विहीर तुमची नाही, ताबडतोब विहिरीचे पाणी काढा. बिरबलाने हे सांगताच त्या माणसाच्या लक्षात आले की आता आपल्या हुशारीचा काही उपयोग होणार नाही. त्याने ताबडतोब राजाची माफी मागितली आणि विहिरीसह पाण्यावर शेतकऱ्याचा पूर्ण हक्क असल्याचे मान्य केले. हे पाहून अकबर राजाने बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आणि विहीर विकणाऱ्या माणसाला फसवणूक केल्याबद्दल दंड ठोठावला.
तात्पर्य : केव्हा स्वतःला इतरांपेक्षा हुशार समजू नये.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments