Dharma Sangrah

आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास हे करा

Webdunia
* आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते.
* आमरस - आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.
 
* श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे.
 
* गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात.
 

* मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत.
 
* बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात. खमंग होतात.
* गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे.
 
* बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Women's Day Special महिलांकरिता सहलीसाठी महाराष्ट्रातील सुरक्षित पर्यटनस्थळे

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात या उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा

NCERT Recruitment : NCERT मधील ११७ पदांसाठी भरतीसाठी लवकर अर्ज करा

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

रात्री ओवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments