Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची कमी करा

spicy to normal
, सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (19:01 IST)
भाजी किंवा डाळीत जास्त मिरची असेल तर चव बिघडते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना काय करावे सुचतं नाही, यासाठी जाणून घ्या काही टिप्स-
 
तूप किंवा लोणी घातल्याने तिखटपणा कमी होईल.
भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही दही आणि ताजी मलई घालू शकता.
जर ती तरळ भाजी असेल, तर त्यात टोमॅटो प्युरीही घालता येते, पण थोडे तेल घालून प्युरी वेगळ्याने परतून घ्यावी.
उकडलेले बटाटे मॅश करून भाजीत मिसळून तिखटपणा कमी करता येतो.
जर भाजी कोरडी असेल तर थोडे बेसन भाजून त्यात मिसळा.
भाजीत नारळाचे तेल टाकल्याने तिखटपणाही कमी होतो.
जर पनीर करी / कोफ्ता वगैरे भरपूर करी असेल तर भाजीत थोडी साखर घातली तर ती चवदार बनते.
जर ग्रेव्ही असलेली भाजी खूप मसालेदार बनली असेल तर थोडे दूध, किसलेला मावा (खवा), काजू पेस्ट, फ्रेश क्रीम इत्यादी घालून चव संतुलित केली जाऊ शकते. एकदा याची चव घ्या आणि आवश्यक असल्यास थोडे मीठ आणि आंबट घाला.
जर बटाटा भाजी असेल आणि भाजी घट्टअसेल तर तुम्ही त्यात उकळलेलं पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर ते उकळी आणा आणि चव घ्या आणि मीठ बघा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा, याचा अर्थ काय जाणून घ्या