Publish Date: Mon, 21 Jul 2025 (20:00 IST)
Updated Date: Mon, 21 Jul 2025 (19:46 IST)
बऱ्याचदा जेवण बनवताना, चुकून किंवा घाईघाईत तिखट जात पडत. यामुळे भाजी तिखट होते. अशावेळेस काय करावे हे सुचत नाही. याकरिता आज आपण काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही नक्कीच भाजीतील तिखटपणा कमी करू शकाल.
उकडलेले बटाटे घाला
भाजीतीलतिखटपणा कमी करण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे घाला. मसालेदार चव संतुलित करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. बटाट्याची पोत अशी असते की ती कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत सहज मिसळते. जर सुकी भाजी तिखट झाली तर चिरलेले उकडलेले बटाटे घाला आणि मिक्स करा.
पनीर मिक्स करा
भाजीमध्ये तिखट कमी करायची असेल तर पनीर वापरा. यामुळे तिखटपणा संतुलित होतो. पनीरच्या सौम्य आणि मलईदार चवीमुळे तिखटपणा कमी होतो. तुम्ही ते लहान तुकडे करून ग्रेव्हीमध्ये घालू शकता. किंवा तुम्ही ते मॅश करून ग्रेव्हीमध्ये घालू शकता.
टोमॅटो प्युरी घाला
भाजीतील तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही टोमॅटो प्युरी घालू शकता. कारण टोमॅटोची आंबट आणि सौम्य गोड चव मिरचीला संतुलित करते.
नारळाचे दूध किंवा क्रीम मिसळा
जर भाजी मसालेदार असेल व तिखट झाली असेल तर तुम्ही त्यात नारळाचे दूध किंवा क्रीम वापरू शकता. या गोष्टी गोडवा वाढवतात आणि भाजीला मलईदार पोत देखील देतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik