suvichar

आवश्यक माहिती: भाज्यांना सेनेटाइज कसे करावे, सोपे 5 उपाय जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 21 जून 2021 (10:46 IST)
सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळे चिंतीत आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून सगळे आपआपल्यापरीने वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. या साठी स्वच्छतेची काळजी सर्व घेतच आहे. त्यामुळेच आपणं संसर्गापासून वाचू शकतो. 
 
घराच्या आणि स्वतःच्या स्वच्छते बरोबरच खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरून खाण्यापिण्याचे पाकीट तसेच भाज्या आणल्यावर त्यांना सेनेटाइज (निर्जंतुक नाशक) करणे महत्त्वाचे आहे. कारण ह्या संसर्गाचे विषाणू कुठेही जाऊन बसतात. दुधाचे पाकीट तर आपणं सेनेटाइज करू शकतो. पण भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना स्वच्छ करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवावे. पण या भाज्यांना आपणं सेनेटाइज कसे करू शकतो. हे जाणून घेणे आवश्यक आहे. 
 
भाज्यांना सेनेटाइज करण्यासाठीचे काही खास टिप्स :
 
1 सर्वप्रथम पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकावं. या मध्ये सर्व भाज्यांना टाकून धुऊन घ्यावे. नंतर नळाच्या पाण्याखाली अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन टाकावे. त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावे.
 
2 पाण्यामध्ये 1 कप ऍपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मीठ घालावे. या पाण्याने सर्व भाज्या धुऊन घ्यावा. नंतर चांगल्या पाण्याने अजून 1 वेळा धुऊन घ्यावा.
 
3 पाण्यात बेकिंग सोडा आणि ऍपल व्हिनेगर टाकावे. या पाण्यात भाज्यांना चांगल्या प्रकाराने चोळून चोळून धुऊन घ्यावे. या नंतर गरम पाण्यात अजून 1 वेळा या भाज्यांना धुऊन घ्यावे.
 
4 गरम पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मीठ टाकावे. या पाण्यात भाज्यांना टाकून स्वच्छ करा. नंतर भाज्यांना नळाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. 
 
5 गरम पाण्यात मीठ आणि व्हिनेगर टाका. ह्या मध्ये भाज्यांना टाकून चोळून चोळून धुवावे. नंतर या भाज्यांना स्वच्छ पाण्याने अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे.   
अशा प्रकारे आपण भाज्यांनासुद्धा सेनेटाइज करू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

सावधान! कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ; होऊ शकते विषबाधा

स्त्रिया या ५ गोष्टी कधीच सांगत नाहीत… पुरुषांनी नक्की जाणून घ्याव्यात

पुढील लेख
Show comments