Dharma Sangrah

हे प्रेम नव्हे... आजार आहे

Webdunia
प्रेमात जुनून असणे वाईट नाही परंतू प्रेमामुळे दुसर्‍याला मानसिक संताप देणे प्रेम नव्हे विकृतपणा आहे.
 
कोणाचा पिच्छा करणे, ब्लॅकमेल करणे, वारंवार मेसेज करणे, फोन करून परेशान करणे, याला 'स्टॉकिंग' म्हणतात. हा गुन्हा असला तरी एका प्रकाराचा आजार आहे हे विसरून चालणार नाही. 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' या आजारामुळे अनेक लोकांना मानसिक कष्ट सहन करावा लागतो.
 
काय आहे ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर?
ही एका प्रकाराची मानसिक स्थिती आहे ज्यात लोकं एखाद्यावर असामान्यपणे आकर्षित होतात. त्यावर केवळ आपला हक्क असून प्रेमाची आस ठेवतात. समोरचा दुर्लक्ष करत असेल तर ते सहन होत नाही आणि कोणत्याही प्रकारे समोरच्या आपलंसं करण्याच्या प्रयत्नात असामान्य कृत्य करतात.
 
आजाराचे लक्षण
कोणाप्रती अतिशय आकर्षण
त्याबद्दल सतत येणारे विचार
समोरच्या हक्क समजणे 
समोरच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणे
त्यांच्याकडून नकार सहन न होणे
समोरच्यावर स्वामित्व दर्शवणे 
सतत त्यांच्याबद्दल बोलणे
सतत त्यांच्या विषय काढणे
समोरच्यामुळे इतर नाती विसरणे
समोरच्याला सतत फोन करणे, मेसेज करणे आणि वैयक्तिकरीत्या किंवा सोशल मीडियावर स्टॉक करणे
ब्लॅकमेल करणे कश्या प्रकारेही स्वत:बद्दल प्रेम निर्माण करवण्याचा प्रयत्न करणे खरंतर हे लक्षण प्रेमात पडल्यावर देखील दिसतात परंतू असामान्य रूपात असे लक्षण दिसणे म्हणजे 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' आजार असल्याचे नाकारता येणार नाही.
 
हा आजार होण्यामागे अनेक कारण असू शकतात. मानसिक आरोग्याशी जुळलेल्या या आजारात लोकांना स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवणे कठिण जातं. 
 
अनेकदा लहानपणी कुटुंबातील वातावरण किंवा नात्यांचे कडवे अनुभव जबाबदार असतात. त्यामुळे असे लोकं कित्येकदा लोकांपासून अती अंतर निर्माण करू घेतात तर कधी समोरच्यावर आवश्यकतेपेक्षा अधिक अवलंबून जातात. तसेच असुरक्षेची भावना देखील जबाबदार ठरते. ज्यात लोकं स्वत:च्या भावना समजू पात नाही आणि नातं टिकेल की नाही याची भीती आणि असुरक्षेची भावना घर करून जाते. किंवा हा आजार होण्यामागे भ्रम देखील कारणीभूत ठरू शकतो. समोरच्या आपल्या प्रेमात आहे असा गैरसमज होतं.
 
काय करावे
जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर अती प्रभाव पडत असून आपण त्याला विसरू शकत नाहीये किंवा यामुळे आपल्या दिनचर्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रभाव जाणवत असेल तर मदत घ्यावी. या साठी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा ज्यावर आपल्याला विश्वास असेल अशा एखादा व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. त्यांचा सल्ला किंवा साथ आपल्याला बाहेर पडण्यात मदत करेल. 
 
अशात आपलं मन इतर कामात रमवावे. दुसर्‍या लोकांसोबत वेळ घालवावा. आणि एवढे करून देखील आपलं मन पुन्हा तिकडे वळत असेल तर आपल्याला मानसशास्त्रज्ञाची गरज आहे समजावे. काउंसलिंग आणि थेरेपी द्वारे यातून निघता येतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Rajma Recipe हॉटेलसारखा चवदार राजमा बनवण्याची सोपी रेसिपी

उष्माघात जीवघेणा ठरू शकतो! उष्माघाताचा त्रास झाल्यास या गोष्टी तातडीने करा

बारावीत कमी गुण मिळाले असतील, तर काळजी करू नका! हे १० पर्याय तुमचा मार्ग निवडायला मदत करतील

परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

घट्ट बूट घातल्याने तुमच्या पायाच्या तळव्यांना वेदना होऊ शकतात, वेदनांची मुख्य कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments