rashifal-2026

नात्यात दुरावा आणतात या 5 गोष्टी, काळजी घ्यावी

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (13:06 IST)
4
नवरा - बायको यांच्यात एक घट्ट असं नातं असतं आणि असे म्हणतात की हे नातं एक किंवा दोन जन्मांचे नसून सात जन्माचे असतं. परंतु आयुष्यात बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते ज्यामुळे हे घट्ट असलेले नाते निव्वळ काही शुल्लक कारणामुळे तुटतात. नातं तुटायचा परिणाम दोंघावर पडतो. अशी कोणती कारणे आहे ज्यांचा मुळे हे नाते दुरावतात हे जाणून घेणे आवश्यक आहे-
 
* लग्नाच्या पूर्वी एकमेकांना समजून घेणं -
लग्न ठरल्यावर मुलगा आणि मुलीमध्ये चांगले संभाषण होणं गरजेचे असते. या मुळे ते दोघे एकमेकांचा स्वभाव आणि विचारांची देवाण घेवाण करू शकतात. आपसात सामंजस्यपणा असेल तर दोघांचे नाते चांगले जुळतील. पण आजच्या काळात देखील अशी काही कुटुंबे आहेत जिथे मुलगा आणि मुलगी भेटणं तर नाही पण त्यांना मनमोकळेपणे बोलणं देखील अशक्यच असत. या मुळे त्यांना भावी आयुष्यात एकमेकांशी जुळवून घेणं अवघड होतं.
 
* लग्नानंतरचा दुरावा - 
नवरा बायको दोघेही कामाला जाणं हे आजच्या आधुनिक काळात सामान्यच आहे. बऱ्याच वेळा काही लोक कामाच्या ठिकाणी मोठ्या पॅकेजच्या आमिषाला भुलून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. या मुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो आणि आपसातील प्रेम कमी होतं. एकमेकांबद्दलचा विश्वास हळू-हळू कमी होऊ लागतो.
 
* ऑफिसमध्ये जास्त वेळ देणं - 
बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये कामाचा जास्त ताण असल्यास काही वेळ जास्त द्यावा लागतो, त्यामुळे घरात मतभेदाचे वातावरण बनतात. जशे आपण बाहेरची जबाबदारी पूर्ण करता त्याच प्रमाणे दोघांना एकमेकांसाठी पुरेपूर वेळ द्यायला पाहिजे. बायकोने देखील आपल्या घराकडे तितक्याच जातीने लक्ष दिले पाहिजे. कामाचा जास्तीचा ताण आपल्या नात्यात दुरावा आणतो आणि हळू-हळू करून हे घट्ट नाते कमकुवत होऊ लागतात. म्हणून दोघांना घरात आणि ऑफिसात संतुलन ठेवता आले पाहिजे.
 
* अधिक व्यस्तता -
आपले दररोजचे जीवन इतके धावपळीचे झाले आहेत की एकमेकांसाठी वेळ काढणं अशक्य झाले आहे. या नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काही वेळ एकमेकांसाठी काढावा. या साठी आपण आपल्या जोडीदारासह बाहेर फिरायला जाऊ शकता. या शिवाय आपण दोघे सकाळच्या वेळ जोडीने वॉकला जाऊन देखील घालवू शकता. या मुळे आपले आरोग्य तर निरोगी राहीलच तसेच नाते देखील निरोगी राहतील.
 
* शंका करणं टाळा -
मित्र बनवणं चुकीचे नसतं. आजच्या काळात मुले-मुली एकत्र काम करतात. म्हणून आपल्या जोडीदारावर सहकाऱ्याला घेऊन शंका करू नये. 
 
शंका करणं ही अशी कीड आहे जी नात्यात लागली की आपल्या बऱ्याच वर्षाच्या नात्याला देखील संपवून टाकते. लक्षात ठेवा की आपल्या शंकेखोर असण्याचा स्वभावामुळे आणि दुर्लक्षित केल्यामुळे एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्या सुखी वैवाहिक जीवनात विष देखील कालवू शकतो. तसेच आपल्या नात्यात दुरावा देखील आणू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

गुरुप्रतिपदा विशेष दत्तगुरुंना गुळ नारळाच्या लाडूचा दाखवा नैवेद्य

हिवाळ्यात फक्त दहा रुपयांत घरी टोनर बनवा

वारंवार सर्दी आणि खोकला होतोय? कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

बीटेक इन एव्हियोनिक्स इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव

पुढील लेख
Show comments