suvichar

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

Webdunia
सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)
लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Shriram Navami Naivedya श्रीराम नवमी निमित्त बनवला जाणारा पारंपरिक प्रसाद

सतत एसीमध्ये राहिल्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Career After 12th Diploma Course in Arts: बारावीनंतर कला शाखेतील हे पदविका अभ्यासक्रम करा

काकडी टोनरने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवा

पुढील लेख
Show comments