Marathi Biodata Maker

खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (20:57 IST)
खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती,
कांहीं न काही कारणे, मनाची झालेली दयनीय स्थिती,
सुचत नाही कसं बाहेर पडावं ह्यातून,
काही जादू तर होणार नाही ना चुकून!
आपल्या परी झगडतं मन मार्ग शोधण्या,
आपल्या पातळीवरील लढाई लढण्या,
कोणाची मदत त्यास कधी कधी वाटे घेऊ नये,
आलेलं आव्हान स्वतः च पेलून का बघू नये?
पण आव्हान कधी कधी पेलवत नाही हे खरं,
तोंडघशी पडतो की काय असं वाटून जातं बरं,
म्हणून वाटत घ्यावी मदत हवीच कोणाची,
स्वतः लाच सवरण्यास द्यावी हाक मदतीची !
हाच आहे खरा मार्ग, बाहेर पडण्याचा,
योग्य तो मार्ग मिळविण्यासाठी धडपडण्या चा!!
.....अश्विनी थत्ते 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

पुढील लेख
Show comments