Dharma Sangrah

कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत

Webdunia
बुधवार, 23 जून 2021 (09:16 IST)
कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकाच्या इंडी या गावात झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.बी.ए.,बी.टी.डी. व बी.एड.या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम केले.त्यांचा विवाह सहाध्यायी नारायण संत यांच्याशी झाला.
 
शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला सुरुवात केली.त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.त्यांनी भारतीय स्त्रीचे खडतर जीवन आपल्या कवितेतून मांडले.इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत यांचा एकत्र एक कविता संग्रह 'सहवास'प्रसिद्द्ध आहे.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या कवितेवर त्याचे परिणाम होऊ दिले नाही.  

इंदिरा संतांनी लिहिलेल्या प्रत्येक रचनेला काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली. यांची सुमारे 25 पुस्तके प्रसिद्ध झाली आहे.यांच्या काही निवडक कविता 'मृण्मयी' या नावाने प्रसिद्ध झाल्या.यांचे निधन 13 जुलै 2000 रोजी पुण्यात झाले.

यांना साहित्य अकादमी पुरस्कार,अनंत काणेकर पुरस्कार,साहित्य कला अकादमी पुरस्कार,महाराष्ट्र शासन पुरस्कार,जनस्थान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 

कविता संग्रह -गर्भरेशीम,निराकार,बाहुल्या,मरवा,मृगजळ मेंदी,रंगबावरी,वंशकुसूम,शेला, या त्यांच्या काही कविता संग्रह आहे.
 
कथासंग्रह-कदली,चैतू,श्यामली,हे त्यांचे कथासंग्रह आहे.

कादंबरी-घुंघरवाळा ही त्यांची कादंबरी आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख