Publish Date: Mon, 13 Jun 2022 (08:40 IST)
Updated Date: Mon, 13 Jun 2022 (08:41 IST)
चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची.आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते.
चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची,आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते.
चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते.आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.
चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात.
चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.
चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.
चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे.आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.
प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..?? कुठे आणि कसे पोहोचलो आपण....??
- सोशल मीडिया