Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चपाती हातात देण्याची चूक तर करत नाही ना? वास्तुनुसार होऊ शकते आर्थिक नुकसान

Webdunia
गुरूवार, 9 जुलै 2026 (17:19 IST)
वास्तु शास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर (किचन) हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यापासून ते ते वाढण्यापर्यंत अनेक नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशीच एक मोठी चूक म्हणजे एखाद्याच्या हातात थेट चपाती किंवा भाकरी देणे. 
 
वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. 
 
आपल्या हिंदू संस्कृतीत पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला देण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. परंतु घरातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना जेवण वाढताना आपण चपाती थेट त्यांच्या हातात देतो का? जर तुम्ही असे करत असाल, तर वेळीच सावध व्हा. वास्तुशास्त्रानुसार, चपाती नेहमी ताटात ठेवूनच वाढली पाहिजे. जाणून घेऊया यामागचे कारण आणि होणारे नुकसान. हातात चपाती देणे का मानले जाते अशुभ?
 
१. दारिद्र्य आणि गरिबीला आमंत्रण
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हातात थेट चपाती देता, तेव्हा घरची बरकत (लक्ष्मी) निघून जाते. असे केल्याने अन्नपूर्णा माता आणि धनलक्ष्मी देवी नाराज होतात, ज्यामुळे घरात पैशांची चणचण भासू लागते आणि गरिबी पाय पसरू लागते.
 
२. पुण्य कर्मांचा नाश होतो
शास्त्रात असे मानले गेले आहे की, हातात ठेवून दिलेली चपाती ही 'भिक्षे'सारखी (भीकेसारखी) मानली जाते. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पाहुण्यांना अशी चपाती दिली, तर त्यांना जेऊ घालण्याचे पुण्य नष्ट होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
 
३. नात्यांमध्ये दुरावा येतो
हातात चपाती दिल्यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीमध्ये वैचारिक मतभेद वाढू लागतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.
 
जेवण वाढण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर जेवण वाढताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या:
ताट किंवा प्लेटचा वापर करा: कोणालाही चपाती द्यायची असेल, तर ती नेहमी प्लेट, ताट किंवा पोळीच्या डब्यात ठेवूनच आदराने वाढावी.
आदराने जेवण वाढा: जेवण नेहमी शांतपणे आणि आदराने वाढले पाहिजे. घाईघाईत किंवा चिडून अन्न वाढल्यास अन्नाचा अपमान होतो.
 
विशेष वास्तु टिप : 
स्वयंपाकघरात जेवताना कधीही एकाच ताटात तीन चपात्या एकत्र वाढू नयेत. तीन ही संख्या अशुभ मानली जाते. जर कोणाला तीन चपात्या द्यायच्याच असतील, तर आधी दोन द्याव्यात आणि नंतर एक वाढावी किंवा चपातीची घडी घालून ती ताटात ठेवावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवारी केवळ 5 मिनिट द्या, बजरंग बली सर्व कामे सुरळीत करतील

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments