Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips:या कारणामुळेच उलटे चप्पल जोडे ठेवण्यास घरातील वडीलधारी मंडळी टोकतात

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (17:40 IST)
वास्तू टिप्स : घरातील वडीलधारी मंडळी  नेहमी जोडे, चप्पलांमुळे टोकत असतात. बहुतेक लोकांना त्यामागील तर्क माहित नाही. मात्र, वडीलधाऱ्यांनी टोकले की आम्ही लगेच चप्पल सरळ करतो. चला तर मग जाणून घेऊया चप्पल उलटी ठेवल्याने काय त्रास होऊ शकतो.
 
लक्ष्मी रागवते  
असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट असतील तर ते ताबडतोब सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीही रागवते. त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे मोठे लोकं सांगतात, त्यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.
 
घरामध्ये आजार, दुःख इत्यादी वाढतो
याशिवाय आणखी एक मत आहे की चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार, दुःख इत्यादी होतात. त्यामुळे चप्पल व बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. चप्पल आणि शूज घरासमोर किंवा घरात उलटे ठेवल्याने घरात भांडण होऊ शकते, असेही मानले जाते. वृद्ध मंडळी सांगतात की, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
 
विचारांवर वाईट परिणाम
घराच्या दारात विसरूनही चपला आणि जोडे उलटे ठेवू नयेत, अशीही श्रद्धा आहे. याचा घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार, शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. त्यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये खूप अडथळे येतात.
 
शनीचा प्रकोप कायम राहतो 
असे मानले जाते की घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचा कारक मानला जातो.
 
( अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही. ) 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

रविवारी करा आरती सूर्याची

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments