Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
आहराबद्दल शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्याने माणूस आनंदी जीवन जगतो. तसेच हिंदू धर्मात स्वयंपाकघराला खूप महत्त्व दिले गेले आहे. हे एक पवित्र स्थान मानले जाते, जिथे तयार केलेले अन्न माणसाला जगण्याचे बळ देते. घरात पोळ्या रोज बनवल्या जातात. हिंदू मान्यतेनुसार स्वयंपाकघरात बनवलेल्या भाकरी किंवा पोळ संबंधित नियमांचे पालन केले पाहिजे. नाहीतर घरात आशीर्वाद राहत नाही. यासोबतच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.
या दिवशी पोळ्या बनवू नाही
एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे खाणे निषिद्ध मानले जाते. त्याच बरोबर दिवाळी, शरद पौर्णिमा, शीतलाष्टमी, नागपंचमी आणि कोणाच्या मृत्यूच्या दिवशी घरात पोळी बनवली जात नाही. हा नियम पाळला नाही तर आई अन्नपूर्णा रागावते. अशा लोकांना अन्न आणि पैशाची कमतरता भासू लागते.
मोजून पोळ्या बनवू नये
पोळ्या बनवण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विचारणे की ते किती खातील किंवा पोळी खाताना मोजणे ही खूप वाईट सवय आहे. हिंदू धर्मात हे शुभ मानले जात नाही. पोळी सूर्याशी निगडीत आहे आणि जेव्हा तुम्ही ती मोजून बनवता तेव्हा तुम्ही सूर्यदेवाचा अपमान करता. अशा परिस्थितीत विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
पोळ्या बनवताना दिशाची महत्त्वाची
पोळी बनवताना काही वास्तु नियमही लक्षात ठेवले पाहिजेत. तुम्ही ज्या स्टोव्हवर अन्न शिजवता तो तुमच्या स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात असावा. पोळी बनवताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे.
पहिली पोळी गायीला
स्वयंपाकघरात बनवलेली पहिली पोळी नेहमी गायीला द्यावी. जर तुम्ही गायीला खाऊ घालू शकत नसाल तर तुम्ही पहिली पोळी किंवा भाकरी कुत्र्याला खायला देऊ शकता. गाय किंवा कुत्र्याने पोळी खाल्ल्याने त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतात.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावरील विश्वासांवर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.