rashifal-2026

अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण का झाली नाही, उच्च न्यायालयाकडून सरकारला विचारणा

Webdunia
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (10:45 IST)
4
अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरी अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण का झाली नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. ‘अर्धे शैक्षणिक वर्ष उलटले आणि उर्वरित कालावधीही पटकन संपेल. अडीच महिने अकरावीची प्रवेश प्रक्रिया का थांबविली आहे,’ असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला केला.
 
व्यवसायाने वकील असलेले विशाल सक्सेना यांच्या मुलीला अद्याप अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे सक्सेना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उत्तर देताना अतिरिक्त सरकारी वकील गीता शास्त्री यांनी राज्य सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे न्यायालयाला सांगितले.
 
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला असाधारण विलंब झाल्याने सक्सेना यांनी २६ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने मुंबई महानगर प्राधिकरणच्या हद्दीतील सुमारे २.३२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने लवकर धोरण आखावे. कारण विद्यार्थी, पालकांना आधीच कोरोनामुळे त्रास सहन करावा लागला आहे, असे सक्सेना यांनी म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना: स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याने ७ कामगारांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे लष्करी वाहन दरीत कोसळले, १० जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

BMC Mayor Reservation Controversy मुंबई महापौरपदाच्या आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांच्या गटाने मंत्रालयात गोंधळ घातला!

योगी - मोदी टार्गेट करताय, शिंदे बनावट हिंदू असल्याचे भासवताय, संजय राऊत यांनी शंकराचार्य वादावर राजकीय बाण सोडला

२०३२ नंतर दिल्ली नव्हे तर नागपूर भारताची राजधानी असेल! सर्वात प्रबळ दावेदार का ?

पुढील लेख
Show comments