Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात चोर असल्याच्या संशयावरून तरुणाची मारहाण करून हत्या, आरोपींना अटक

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (18:40 IST)
ठाण्यात चोर असल्याच्या संशयावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली नंतर त्याचा मृत्यू झाल्यावर मृतदेह झुडपात फेकण्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात 24 जुलै रोजी ठाण्यातील दिवा परिसरात झुडपात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली.  पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तरुणाला जबर मारहाण केल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी खुनाचा शोध लावणे सुरु केले. 

तपास करताना पोलिसांना कळाले की, गेल्या बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा तरुण मुंब्य्रातील एका कार वॉशिंग सर्व्हिस सेंटरच्या जवळ आला. तिथे उपस्थित असलेल्या चौघांनी त्याला चोर असल्याचे समजून जबर मारहाण केली. तो त्यांना सोडण्यासाठी विनवणी करत असताना त्यांनी त्याला मारहाण करणे सुरु ठेवले.

आरोपींनी त्याला बळजबरी एका ऑटोरिक्षात बसवले आणि मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. नंतर आरोपींनी मृतदेह झुडुपात फेकून दिले आणि पसार झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर पुरावे गोळा केले आणि आरोपींना शोधले आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments