Dharma Sangrah

विश्रांती घेतल्यानंतर शरद पवारांची सक्रीय कामाला सुरुवात - नवाब मलिक

Webdunia
गुरूवार, 27 मे 2021 (19:28 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. विश्रांती घेतल्यानंतर कालपासून त्यांनी सक्रीय कामाला सुरुवात केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 
 
बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि आज सकाळी खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भेट घेतली. 
 
१ जून रोजी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मंत्र्यांच्या कामाचा आढावा, राजकीय परिस्थितीवर चर्चाही करणार आहेत असे नवाब मलिक यांनी सांगितले. 
 
शरद पवारसाहेबांनी सक्रीय कामाला सुरुवात केल्यामुळे पक्षाला आणखी उभारी मिळेल आणि ताकदही मिळेल असेही नवाब मलिक म्हणाले. 
 
पश्चिम बंगाल निवडणूकीच्या आधी शरद पवारसाहेबांनी सर्व विरोधी पक्षांना एकजूट केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती त्याअनुषंगाने कामाला सुरुवात करणार आहेत. शिवाय आजच्या घडीला केंद्रसरकार ज्यापध्दतीने कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतेय. त्याचबरोबर संपूर्ण देशात लसीबाबत तुटवडा असताना त्याच्यावर पर्याय निघत नाहीय. खतांचा दर वाढवण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी पत्र दिल्यावर केंद्राने तो निर्णय मागे घेतला असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments