Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (16:55 IST)
कोणत्याही कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी गद्दार किंवा देशद्रोही ठरत नाही. आंदोलकांवर अश्याप्रकारचे लेबल लावणे चूकीचे आहे, असे मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुधआरीत नागरीकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी म्हटले आहे. सीएए विरोधात शातंतापूर्ण मार्गाने आदोंलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे म्हणून ते दडपून टाकता येणार नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.  सीएए विरोधी आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याच्या विरोधात न्यायालयात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे मत व्यक्त केले आहे.
 
सीएए व एनआरसीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी इफ्तिकार जखी शेख यांनी परवानगी मागितली होती. माजलगावातील जुन्या ईदगाह मैदानात हे आंदोलन करण्याची त्यांची योजना होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत बीड जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्याचाच आधार घेत माजलगाव शहर पोलिसांनीही निदर्शनांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकारी व पोलिसांचा हा आदेश रद्द केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांची अभिजीत दीपके यांच्यासोबत भेट; शिंदे आपल्याच नेत्यांवर नाराज

पिंपरी-चिंचवडमध्ये आर्थिक अडचणींमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची आत्महत्या

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू, सक्तीच्या धर्मांतरासाठी १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

LIVE: महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: 'अंमली पदार्थ विरोधी कृती दल' स्थापन होणार

पुढील लेख
Show comments