Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदलापुरा...फडणवीस हातात रिव्हॉल्व्हरचे पोस्टर मुंबईत झळकले, उद्धव ठाकरे गटाकडून सडकून टीका

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (19:51 IST)
बदलापुरातील बलात्काराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला त्याच्या माजी पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलीस वाहनातून नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात होते. 
 
यादरम्यान त्याने ठाण्यातील मुंब्रा बायपासजवळ एका पोलिसाचे पिस्तूल हिसकावले, त्यानंतर गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.  या एन्काउंटरवरून महाराष्ट्रात विरोधी पक्ष राज्य सरकारवर ताशेरे ओढत आहे. या चकमकीनंतर मुंबईत बदलापुरा असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक दाखवण्यात आली आहे. या बॅनरवर कोणत्याही संस्थेचे नाव नाही. या पोस्टरमुळे खळबळ उडाली आहे. 
 
या पोस्टरबाबत युबीटीचे नेत्यांनी प्रश्न निर्माण केले आहे. विरोधी पक्षाचे नेते म्हणतात 
मुंबईत अनेक ठिकाणी मोठे होर्डिंग्स लावण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्रीच्या हातात पिस्तूल असून मोठ्या अक्षरात बदला पुराअसे लिहिले आहे. 

हे बॅनर कोणी लावले आहे याचा खुलासा व्हायला हवा. ज्याने हे बनवले आहे आणि लावले आहे त्याच्यावर कारवाई का होत नाही? हे होर्डिंग्स का काढले जात नाही. 
तुम्ही ही होर्डिंग्ज लावलीत तर तुम्ही हायकोर्टापेक्षा मोठे झालात का? वस्तुस्थिती बाहेर यावी लागेल. त्याचा तपास सुरू आहे. सर्व काही बाहेर येईल पण श्रेय घेण्याचे हे कसले राजकारण?
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Gold की Stock Market, आता कुठे गुंतवणूक फायदेशीर ठरेल?

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

हिंदूने कलमा पठण केले, पत्नीने सिंदूर पुसले, आसाममधील एका प्राध्यापकाने प्राण कसे वाचले ते सांगितले Pahalgam Terror Attack

सीमा हैदरलाही ४८ तासांच्या आत भारत सोडावा लागणार का? काय निर्णय घेतला जाईल?

जम्मूहून ७५ प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत पोहोचले

पुढील लेख
Show comments