Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळावर गोंधळ, चेंगराचेंगरीसारखी स्थिती, अनेकांची फ्लाईट मिस

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (11:07 IST)
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी गोंधळ पहायला मिळाला. प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या गैरव्यवस्थापनाचा फटाका प्रवाशांना बसत आहे. यात 30 हून अधिक प्रवाशांची फ्लाईट मिस झाल्याचे समजते.
 
राज्या निर्बंधात दिलेली शिथिलता आणि वाढत असलेल्या लसीकरणाच्या प्रमाणाचा थेट प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. 
 
शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर या गर्दीने कळस गाठला. प्रवेशद्वार तसेच चेक इन काउंटरवर सुरक्षारक्षक कमी असल्यामुळे प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या. रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली तरी प्रवाशांना प्रवेश मिळत नव्हता.
 
त्यामुळे संतप्त प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि एअरपोर्ट व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. फ्लाईट सुटत असल्यामुळे काहींना क्यू लॉक तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
 
मुंबई हैदराबाद विमान 15 हून अधिक प्रवाशांना न घेताच निघून गेले. इतर 15-20 प्रवाशांसोबत देखील असेच घडले. त्यामुळे विमानतळावर धावाधावा सुरु झाली. काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
गेल्या काही दिवसात कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने टर्मिनल 1 बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे त्यामुळे भार होत असल्याचे समजते.
 
नवरात्री आणि विकेंडच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विमानतळावर अभूतपूर्व गर्दी झाली. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली. येत्या 20 ऑक्टोबरपासून टर्मिनल 1 खुले होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments