Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:16 IST)
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. कंबोज यांनी ट्विट करून “जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली”असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. अमित शाह यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती.
 
दरम्यान, मोहित कंबोज यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच विद्या चव्हाण यांना जय श्रीराम, असे ट्विट केले होते. परंतु, यातून पूर्ण अर्थ स्पष्ट होत नव्हता. परंतु, आज गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कंबोज यांनी दुसरे ट्विट करून जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments