Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हत्येनंतर मृतदेह गायब, मृतदेहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

Webdunia
मंगळवार, 9 जून 2020 (09:00 IST)
मुंबईतील गोवंडी परिसरात कोरोनाबाधित रुग्णाची  हत्या करण्यात आली होती. या  हत्येच्या पाच दिवसांनी या रुग्णाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणात  शिवाजी नगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीवर 3 जून रोजी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या व्यक्तीला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ज्यावेळी या व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणलं, तेव्हा तो जिवंत होता. मात्र, काहीच वेळात वेळात त्याचा मृत्यू झाला.या व्यक्तीची जोपर्यंत कोरोनाची टेस्ट होत नाही, तोपर्यंत त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही, अशी भूमिका राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाच्या डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे 3 जून रोजी मृत व्यक्तीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला.
 
सोमवारी त्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल आला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेले. तेव्हा, या व्यक्तीचा मृतदेह गायब असल्याचं कळालं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चिंता वाढली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

J&K : किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, महाराष्ट्रातील एक जवान शहीद

LIVE: धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, आमदार अनिल गोरेंनी केला आरोप

धक्कादायक, 70 वर्षीय रुग्णाच्या पोटातून 8125 दगड काढले, एक तास चालली शस्त्रक्रिया

महाराष्ट्रात पावसाचा कहर, दोन दिवसांत 20 हून अधिक जणांचा मृत्यू, मुंबईत अलर्ट

पुढील लेख
Show comments