Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची सखोल चौकशी करा : मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (16:27 IST)
सोमवारी सकाळी मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. 
 
मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळं काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झालं. सर्वसामान्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. परिणामी भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 
 
मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसंच यासाठी कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, सकाळच्या वेळेत रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी ज्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mumbai First Amrit Bharat Train अमृत भारत ट्रेन कोणत्या मार्गांवर धावेल जाणून घ्या

५२ वर्षीय महिला २५ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, कुटुंब सोडून लग्न केले!

What Is Kalma: कलमा म्हणजे काय? पर्यटकांना हे वाचण्याचा आदेश दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला

मोठी कारवाई: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल आणि आसिफ यांचे घर स्फोटात जमीनदोस्त

LIVE: काश्मीरमधून 500 हून अधिक पर्यटक महाराष्ट्रात परतले

पुढील लेख
Show comments