Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार

Webdunia
मंगळवार, 20 जुलै 2021 (15:37 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.कारण,डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यामध्ये रायबो फार्म या कंपनीकडून केमिकलचे पाणी सोडले जात होते,त्यामुळे नाल्यातील पाणी विषारी होऊन त्याला हिरवा रंग आला होता.स्थानिक नागरिकांमधून याबाबत काहीतरी उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेत, संबंधिक कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले व हा प्रकार थांबला.
 
”डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार.यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा.” असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
 
तर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने, केमिलकचे पाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतरचा नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला आहे.
 
डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली आहे.महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यां विरोधात कडक पावले उचलली जातील.कारवाई केल्यानंतरचा हा व्हिडीओ” असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments