Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:33 IST)
मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली. मात्र केंद्र सरकार आणि लस उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून मुंबईतील शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने मुंबई महापालिकेला अधूनमधून लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे.
 
कोविड – १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
 
दरम्यान आज मुंबईत गेल्या २४ तासांत २८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार ६५९वर पोहोचले आहेत.यापैकी आतापर्यंत १५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १२ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments