Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई महापालिकेने उद्यानांचा कालावधी वाढवला, पहाटे ५ ते रात्री १० पर्यत उद्याने उघडी

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2023 (21:17 IST)
मुंबई महापालिका उद्यान विभागाने उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क आदी ठिकाणी नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार ते शुक्रवार या कालावधीत पहाटे ५ ते रात्री १० ( दुपारी १ ते ३ बंद) या  कालावधित सलग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यापूर्वी, सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीतच पालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क खुली ठेवण्यात येत होती. मात्र आता सकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या सत्रात असे प्रत्येकी १ तास वेळ वाढवून दिल्याने दिवसभरात तब्बल ३ तास अधिकचा वेळ उद्याने, मैदाने वापरणाऱ्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 
 
खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिकेची उद्याने व मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. तथापि, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱ्या अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरूक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
 
मुंबई शहर व उपनगरे आदी भागात महापालिकेची सध्या २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पुढील लेख