Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईचा विहार तलाव भरून वाहू लागला

Mumbai's Vihar Lake began to overflow Maharashtra News Mumbai News In marathi Webdunia Marathi
, सोमवार, 19 जुलै 2021 (08:09 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक मात्र लहान असलेला विहार तलाव १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे.तत्पूर्वी, तुळशी तलाव हा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, पवई तलाव १२ जून रोजी दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला होता. आता विहार तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब सुखावह ठरली आहे. गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
 
विहार तलावाची पाणी साठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर इतकी आहे.मुंबईला मुंबईबाहेरील प्रमुख पाच तलाव आणि मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,पुण्याला ऑरेंज अलर्ट