Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर दाखल, पहिल्यांदाच घेणार दर्शन

Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (13:09 IST)
नारायण राणे आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीहून मुंबई येथे दाखल झाले. त्यानंतर अंधेरी परिसरातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात झाली.
 
राणे यांनी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणे यांची यात्रा मार्गस्थ झाली.
 
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा यानंतर वांद्रे आणि कलानगरच्या दिशेने जाणार आहे. त्याठिकाणी राणे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
 
यात्रेदरम्यान, खेरवाडी येथे नारायण राणे यांचं भाषण झालं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राणे यांचा पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यासुद्धा उपस्थित होत्या.
 
महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. या भूमीवर फिरण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही दोन वर्षात राज्याला कसं मागे नेलं, हे आम्ही जनआशीर्वाद यात्रेतून लोकांना सांगू, आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवू, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला यावेळी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments