Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवला

Webdunia
गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:08 IST)
मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय  घेतला आहे. या अगोदर रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यामुळे आता मुंबईत रात्रीचा कर्फ्यू नसणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
ख्रिसमस व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत होता. याची मुदत ५ जानेवारी पर्यंतच होती. ही मुदत संपलेली असल्याने आणि राज्य सरकारकडून कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याबद्दल कुठलीही सूचना आली नसल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईमधील नाईट कर्फ्यूचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: औरंगाबादनंतर नागपूर खंडपीठला मिळाली बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले

Terrorist attack in Pahalgam: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांसह परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू

औरंगाबादनंतर नागपूर खंडपीठला मिळाली धमकी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार

पुढील लेख
Show comments