Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धारावीत 7 दिवसात एकही मृत्यू नाही

Webdunia
मंगळवार, 9 जून 2020 (12:03 IST)
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे त्यात मुंबईतील वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. अशात एक सकारात्मक बातमी म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत गेल्या सात दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. 
 
एकेकाळी कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट धारावी येथे कोविड -19 च्या संख्येतही घट आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
 
बीएमसीच्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 जून रोजी धारावी येथे कोरोना विषाणूचे 34 रुग्ण नोंदविले गेले होते, तर 7 जून रोजी एकूण 13 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जूनला 10, 5 जूनला 17 आणि 4 जून रोजी 23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 30 मे पासून धारावीत कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. 7 जूनपर्यंत धारावीमध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,912 होती. 
 
बीएमसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार धारावीची लोकसंख्या 8.5 लाख आहे. परिसरातील एकूण 8,500 लोकांना विविध ठिकाणी सरकारी क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं. तसेच बीएमसीचे आरोग्य कर्मचारी, खासगी दवाखाने, मोबाइल व्हॅन, महानगरपालिकेचे दवाखाने इत्यादींनी सुमारे सहा ते सात लाख लोकांची घरोघरी चौकशी केली. सतत चाचण्या आणि जास्तीत जास्त तपासणीनंतर यश मिळत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments