Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे फायरब्रँड

Webdunia
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (10:45 IST)
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे हेच फायरब्रँड असल्याचे मनसे सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे.
 
अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना शिवसेना खासदार राऊत यांनी ’रोखठोक'मधून महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्य दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असे भाष्य केले होते. तसेच यात राज ठाकरेंचाही उल्लेख होता. यावरून खोपकरांनी उत्तर दिले आहे.
 
खोपकर म्हणाले की, सगळीकडून कोंडीत सापडला आहात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचे कसे होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरे, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झाला आहे तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच.
 
राऊत यांनी, ‘ठाकरे' हा महाराष्ट्राच स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ’ब्रँड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हटले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments