Publish Date: Wed, 18 Sep 2024 (09:42 IST)
Updated Date: Wed, 18 Sep 2024 (09:45 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये भारताची बदनामी करण्यापासून रोखण्यासाठी त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यमंत्री आठवले यांनी पालघर येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचे सांगितले.
तसेच राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात केलेल्या काही प्रतिक्रियांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, राहुल गांधी परदेशात जाऊन अशी विधाने करून भारताची बदनामी करतात. त्यांना अशा प्रकारची टिप्पणी करण्यापासून रोखण्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा.
Edited By- Dhanashri Naik