Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत दोन्ही मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (16:16 IST)
मुंबईत बहुचर्चित मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. या वर्षाअखेर दोन्ही मेट्रो सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या लोकलमधील गर्दी तर जीवघेणी आहे. असं असतांना पश्चिम उपनगरासाठी दोन मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 31 मेला मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
 
असा असणार मेट्रोचा मार्ग 
मेट्रो 2 ए मार्ग - दहिसर ते डी एन नगर
गजबजलेल्या लिंकिंग रोडवर मेट्रो 2 ए चांगला पर्याय ठरणार
18.589 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
प्रकल्प खर्च 6410 कोटी रुपये
 
मेट्रो 7 मार्ग - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व
अत्यंत वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार,
16.4 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
प्रकल्प खर्च 6208 कोटी रुपये
 
या मार्गावरील बहुतेक सर्व मेट्रो स्थानकांचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले असून आता ही मेट्रो स्थानके आता मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. या मार्गावरील काही ठिकाणी OHE - overheads wire मधून 25,000KV क्षमतेचा विद्युत पुरवठा सुरू करत तपासला गेला आहे. येत्या 31 मे ला मेट्रो 2 A च्या दहिसर - कामराज नगर आणि चारकोप डेपो मार्गावर तर मेट्रो 7 च्या आरे ते दहिसर मार्गावर मेट्रोच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments