Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्री पुलाचा पुलाचा सर्वात कठीण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (09:09 IST)
मुंबईतील कल्याण येथील पत्री पुलाच्या  उर्वरित 10 टक्के गर्डर लॉचिंगचे काम रात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक येऊन सुरु झाले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. 
 
पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा 76 मीटर गर्डर लाँचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी 21 नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित 40 मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 22 तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे 90 टक्केच काम होऊ पूर्ण शकले. उर्वरित 10 टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती.  रेल्वे प्रशासनाने रात्री 1.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला.
 
मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरु झालेले गर्डर लाँचिंगचे काम पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण झाले. श्रीकांत शिंदे हे सकाळप्रमाणेच मध्यरात्रीही काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी हजर होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

अमित शहा यांनी आपली चूक मान्य करावी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संजय राऊत संतापले

अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Date: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी

संतोष देशमुखांच्या मुलीला बारावीत 85 टक्के,बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली

पुढील लेख
Show comments