Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका, FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

Webdunia
सोमवार, 25 एप्रिल 2022 (21:14 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट तसेच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्यावर देशद्रोहासह अन्य कलामांन्वये गुन्हे दाखल आहेत. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने आज मुंबई हायकोर्टात (mumbai high court) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
 
नवनीत राणा (navneet rana)आणि रवी राणा (ravi rana) यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात सादर केली होती. पोलिसांची कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजद्रोहाचे कलमही त्याच उद्देशाने लावण्यात आलं आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्याचे आणि एफआयआरही रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती राणा दाम्पत्याने या याचिकेत केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली. जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तरी आपल्या विरोधकांशी आदरात्मक विरोध असावा. आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments