Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षात बसलेल्या पत्नीने बोलण्यास नकार दिला, पतीने भर रस्त्यात हत्या केली

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:48 IST)
ऑटोरिक्षात बसलेल्या पत्नीने पतीशी बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची हत्या केली. चेंबूरच्या अशोक नगरमध्ये झालेल्या या हत्येने लोक हादरले आहेत. आरसीएफ पोलिसांनी आरोपी पती अक्षयला अटक केली आहे.
 
आकांक्षाला तिचा २१ वा वाढदिवस साजरा करून एक आठवडा झाला होता. आकांक्षा हिच्या हत्येने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आकांक्षा खरटमल यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोघेही खूप आनंदात होते, पण लवकरच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. लग्नानंतर चार महिन्यांनी आकांक्षा माहेरी राहू लागली.
 
बुधवारी सकाळी आकांक्षा कुठेतरी जात होती. अक्षयने दुचाकीवरून रिक्षाचा पाठलाग करत अशोक नगरमधील मधल्या रस्त्यावर ऑटोरिक्षा थांबवली. त्यानंतर तो रिक्षात बसण्याचा प्रयत्न करू लागला. अक्षयला काहीतरी बोलायचे होते, पण आकांक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अक्षयने आकांक्षा हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला.
 
तिला जखमी अवस्थेत सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केले गेले पण तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहे.

photo: symbolic

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments