Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांजूरमध्ये 'मेट्रो-३'चे कारशेड नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांकडून 'तो' आदेश मागे

Webdunia
बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:24 IST)
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-3 या महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो प्रकल्पाचे कारशेड शिंदे-भाजप सरकारने पुन्हा आरेमध्ये हलवून त्याप्रमाणे कामही सुरू केल्याने कांजुरमार्गमध्ये ते होणार नसल्याचे स्पष्ट झालेच होते.
 
1ऑक्टोबर 2020च्या आदेशाद्वारे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजुरमार्गच्या एकूण जमिनीपैकी 102 एकर जमीन 'एमएमआरडीए'ला कारशेडसाठी हस्तांतर केली होती, तो आदेश जिल्हाधिकाऱ्यांनीच मंगळवारच्या आदेशाने रद्दबातल ठरवला. परिणामी कांजुरमध्ये कारशेड होणार नाही, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले.
 
'29 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो वॉर रूम बैठक झाली. त्यानंतर जमीन हस्तांतरणाचा आदेश मागे घेण्याची विनंती 'एमएमआरडीए'ने त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी 30 ऑगस्टच्या आदेशाद्वारे आपल्या कार्यालयाचा 1 ऑक्टोबर 2020चा आदेश रद्दबातल केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या याचिकेचा आधारच गेलेला असल्याने याचिकेत अर्थ उरलेला नाही', असे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला आदेशाची प्रत दाखवत सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Boycott Turkey मुंबई विमानतळावर तुर्की सेवा बंद होणार! शिवसेनेने गोंधळ घातला, बंद केल्यास काय परिणाम होईल?

कोण आहे विजय शाह? ज्यांच्याविरुद्ध कर्नल सोफियाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे FIR दाखल

२७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार, देशातील १४ राज्यांमध्ये वादळासह पावसाचा इशारा जारी

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

म्यानमारपासून कच्छपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments