Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पश्चिम बंगालमधील बीरभूम मध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात साप आढळला

Webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (18:51 IST)
पश्चिम बंगाल मध्ये राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात साप आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विषारी अन्न खाल्याने 16 विद्यार्थी आजारी पडले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मयुरेश्वर येथे मांडलपूर प्राथमिक शाळेत भोजनात विषारी साप आढळल्याने विषारी अन्न खाऊन 16 विद्यार्थांना विषबाधा झाली आहे.  विद्यार्थ्यांना रामपूर हाट मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळेत आंदोलन  केले.  
 
सोमवारी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जात होते. सुमारे 20 विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर अचानक शिजलेल्या वरणात मृत साप पडलेला दिसला. यानंतर मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांनी जेवण देणे बंद केले. 20 पैकी 16 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंदोलक पालक म्हणाले, “मांडलपूर प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी आणि शिक्षक दुर्लक्ष करतात. प्रत्येकजण बेफिकीरपणे स्वयंपाक करतो. आज शिजवलेल्या डाळीत साप दिसला.हे विषारी अन्न खाऊन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी केली जाण्याचे 
सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे शाळेच्या व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments