Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

15 दिवसांनंतर केरळमध्ये शाळा सुरु

Webdunia
गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:50 IST)
केरळमध्ये शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सुमारे 15 दिवसांनंतर सुरु झाल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शैक्षणिक संस्थांच्या इमारतीत साचलेली दलदल आणि केरकचरा हटवून त्या स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. पुरामुळे नष्ट झालेली पुस्तके आणि विद्यार्थ्यांचे गणवेश राज्य सरकार विद्यार्थ्यांना पुरवणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली  आहे. अनेक शाळांत अजूनही पुराने बेघर झालेले 1 लाख 97 हजार नागरिक राहत आहेत. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवण्याचे प्रयत्न लष्करी पातळीवर सुरु आहेत. येत्या 3 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस सुरु होतील असा विश्वास केरळचे शिक्षणमंत्री प्रा.सी रवींद्रनाथ यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे महापुराचा प्रचंड फटका बसलेला कोची विमानतळ पुन्हा पूर्णपणे सुरु करण्यात आला. या विमानतळावरून 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डाने पार पडली. 30 विमानाचे लँडिंगही कोचीत झाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments