Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहीहंडी उत्सव, थर रचताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (09:31 IST)
मुंबईत दहीहंडीचा उत्सवाला गालबोट लागले आहे. धारावीत थर रचताना चक्कर येऊन पडल्याने २७ वर्षीय कुश खंदारे याचा मुत्यू झाला आहे. धारावी बाळ गोपाळ पथकाचा हा गोविंदा होता. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुशला सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.
 
दरम्यान, दहिहंडीसाठी मानवी मनोरे रचताना आतापर्यंत ६० गोविंदा जखमी झाले असून यांपैकी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यात धारावीतील २७ वर्षाच्या कुश खंदारे या गोंविदाचा मृत्यू झाला आहे. पहिल्या थरावर असताना फिट आल्याने तो थरावरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments