Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीमा भागात १३ हजार बंकर बांधले जाणार

Webdunia
गुरूवार, 5 एप्रिल 2018 (11:10 IST)
केंद्र सरकारने आता सीमेवर राहणाऱ्या नागरिकांसाठी बंकर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू- काश्मीरमधील सांबा, पुँछ, जम्मू, कठूआ आणि राजौरी या पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास १३ हजार बंकर बांधले जाणार आहेत. याशिवाय या जिल्ह्यात १, ४३१ मोठे बंकर (कम्यूनिटी बंकर) देखील बांधले जाणार असून एका बंकरमध्ये किमान ४० लोकं राहू शकतील.
 
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला (एनबीसीसी) जम्मू- काश्मीरमधील सीमेवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सीमेपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांसाठी बंकर बांधण्याचे काम एनबीसीसीला देण्यात आले आहे. १६० चौरस फुटाच्या खासगी बंकरमध्ये ८ ते १० लोकं राहू शकतील. याशिवाय एका कम्यूनिटी बंकरमध्ये ४० जणांना राहता येणार आहे. या कामासाठी ४१६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments