Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षणाचे भगवीकरण झाले तर त्यात चूक काय? - व्यंकय्या नायडू

Webdunia
रविवार, 20 मार्च 2022 (10:26 IST)
"आपल्यावर शिक्षणाचे भगवीकरण केल्याचा आरोप आहे. पण मग भगव्यामध्ये काय चूक आहे?" असा सवाल भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी केला आहे.
 
व्यंकय्या नायडूंनी शनिवारी देशातील लोकांना त्यांची 'वसाहतवादी मानसिकता' सोडण्यास आणि त्यांच्या ओळखीचा अभिमान बाळगण्यास शिकण्यास सांगितले.
 
तसेच, त्यांनी यावेळी सांगितले की, "देशातील लोकांना स्वतःच्या अस्मितेचा अभिमान हवा. मेकॉले शिक्षण पद्धतीला संपूर्णपणे नाकारले पाहिजे. मेकॉले शिक्षण पद्धतीने देशात शिक्षणाचे माध्यम म्हणून परदेशी भाषा लादली आणि शिक्षण उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित केलं, त्यामुळे ही पद्धती नाकारण्याचं आवाहनही नायडू यांनी केलं आहे."
 
"सर्वे भवनतु सुखिनः (सर्व सुखी रहा) आणि वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब आहे), जे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेले तत्वज्ञान आजही परराष्ट्र धोरणाचा भाग आहेत, ही भारताची मार्गदर्शक तत्त्वे आहेत," असं उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "आपल्या वारशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे. आपण आपली वसाहतवादी मानसिकता सोडून दिली पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांच्या भारतीय अस्मितेचा अभिमान बाळगायला शिकवले पाहिजे. आपण शक्य तितक्या भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत. आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. ज्ञानाचा खजिना असलेले आपले धर्मग्रंथ जाणून घेण्यासाठी आपण संस्कृत शिकली पाहिजे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments