Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज संकट: देशातील अनेक राज्यांमध्ये वीज संकट ,दोन ते आठ तासांची कपात

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (11:28 IST)
देशातील अनेक राज्यांमध्ये लोकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. कडक उष्मा आणि कोळशाचा तुटवडा यामुळे हे घडत आहे. वीज प्रकल्पांमध्ये कमी उत्पादनामुळे राज्ये प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत.वीजपुरवठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका कारखान्यांना बसतो. देशात मार्च महिन्यातील विक्रमी उष्म्यानंतर एप्रिलमध्येही उन्हाचा कडाका कायम आहे. अशा स्थितीत विजेच्या मागणीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
 
बातमीनुसार, देशातील एकूण वीज संकट 623 दशलक्ष युनिट्सवर पोहोचले आहे. मार्चमधील एकूण वीजटंचाईपेक्षा हा आकडा अधिक आहे. या संकटाचा केंद्रबिंदू कोळशाचा तुटवडा आहे. देशातील 70 टक्के वीज कोळशातून निर्माण होते. मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचा दावा सरकार करत आहे, परंतु वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा नऊ वर्षांतील सर्वात कमी आहे. याशिवाय, युक्रेन-रशिया युद्धामुळे कोळशाच्या आयातीत घट आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा किमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये लोकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments