Publish Date: Wed, 26 Jul 2017 (09:14 IST)
Updated Date: Wed, 26 Jul 2017 (09:15 IST)
केंद्र सरकार कोणत्याही शालेय पाठ्यपुस्तकांमधून रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीचा मजकूर वगळणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. ते मंगळवारी राज्यसभेत बोलत होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी जावडेकर यांनी म्हटले की, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांविषयी व त्यांच्या साहित्याविषयी सरकारला आदर आहे. आम्हाला या प्रत्येकाचेच कौतुक आहे. त्यामुळे कोणताही मजकूर शालेय पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात येणार नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.