Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींचा संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ

Webdunia
सोमवार, 26 जुलै 2021 (13:10 IST)
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा (26 जुलै 2021) गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.

आज संसदेचं कामकाज सुरू होण्याआधीच काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसदभवन परिसरात आले.
शेती संदर्भात करण्यात आलेल्या 3 कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीच्या सीमांवर गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.
 
"नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत आहे, तसंच सरकारने आणलेले 3 कृषी कायदे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. ते त्यांना मागे घ्यावे लागतील," असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.
 
 
दुसरीकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीतल्या जतरमंतरमध्ये प्रतिकात्मक संसद भरवली आहे. शेतकरीविरोधी कायदे संपवा, अश त्यांनी मागणी आहे.तिकडे संसद भवन परिसरात अकाली दलाच्या खासदारांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments