Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे निधन

Webdunia
प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील फली एस नरिमन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्नास घेतला. इंदिरा गांधी सरकारच्या काळात ते देशाचे अतिरिक्त स़ॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लीजेंड देखील म्हटलं जातं.  
 
मुंबई हायकोर्टात १९५० मध्ये वकील म्हणून त्यांनी कामकाज सुरु केले. बुद्धी आणि अभ्यासाच्या जोरावर सुरुवातीच्या काळातच त्यांनी नाव कमावले. ते गेले ७० वर्षात कायदा क्षेत्रात आहेत. १९७२ मध्ये ते सुप्रीम कोर्टात दाखल झाले. मुंबईतून दिल्लीत आल्यानंतर त्यांच्याकडे सॉलिसिटर जनरलची जबाबदारी देण्यात आली होती.
 
नरिमन हे बार कॉन्सिलचे १९९१ ते २०२० काळात अध्यक्ष होते. इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर कमरसियल आर्बिटिरेशनचे ते अध्यक्ष देखील होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. भारताचा न्यायिक व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास होता.
 
प्रख्यात कायदेतज्ज्ञ म्हणून ओखळ असलेल्या फली एस नरिमन यांचा १९९१ मध्ये पद्म भूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments