Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलेट ट्रेन विचार न करता घेतलेला निर्णय : शरद पवार

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:28 IST)

बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, विचार न करता याबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केली. बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला कमी होणार असतानाही महाराष्ट्र व गुजरातवर समान आर्थिक बोजा टाकण्याचा अन्याय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला कसा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बुलेट ट्रेनपेक्षाही हा मोठा निधी सध्याच्या रेल्वेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, चंद्रपूर-मुंबई रेल्वेसाठी किंवा पाटबंधाऱ्यांसाठी वापरला असता तर ते अधिक फायद्याचे ठरले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली.

शरद पवार रविवारी विविध कार्यक्रमांसाठी नगरमध्ये आले होते. बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. सध्या रेल्वेची सुरक्षितता, स्वच्छता, गुणवत्ता, स्थानकांची व्यवस्था व प्रवाशांची सुविधा हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments